सामाजिक

राहुरीत दिव्यांगांना मोफत वस्तू वाटप

राहुरी प्रतिनिधी : राहुरी विस्टीयॉन टेक्निकल एड सर्विस इंडिया लिमीटेड पुणेचे अध्यक्ष आशिष भाटिया व राहुरी तालुका प्रहार संघटनेच्या यांच्या संयुक्त विद्यमाने राहुरी तालुक्यातील 46 दिव्यांगांसाठी जयपूर फूट व क्यालीबर बूट चे मोफत वाटप करण्यात आले. 

या कार्यक्रमाचे उदघाटन माजी नगराध्यक्षा डॉ. सौ. उषाताई तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर प्रहारचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव पोकळे होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थीती मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीआप्पा डौले, आर पी आय चे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, सावता माळी युवक संघटनेचे  जिल्हाध्यक्ष अशोकराव तुपे, ईरिकेशन अधिकारी बडाख, युवा उद्योजक नरेंद्र चव्हाण उपस्थित होते. प्रास्ताविक राहुरी तालुका अध्यक्ष मधुकर घाडगे यांनी केले. सुत्रसंचालन जिल्हा समन्वयक अप्पासाहेब ढोकणे यांनी केले.
विस्टीयॉन या कंपनीच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी चांगल्या प्रतीचे जयपूर फूट व क्यालीबरं मिळाल्याने ते दिव्यांगांसाठी स्वावलंबी होण्यास मदत होणार आहे. जे दिव्यांग दोन्ही पायाने दिव्यांग आहे त्यांना क्यालीबरं मुळे चांगले चालता येणार आहे. काही दिव्यांगांचे अपघातामुळे पाय गेले ते घरात होते. त्यांना आता जयपूर पाय मिळाल्याने स्वतःच उद्योग-व्यवसाय करू शकणार आहे, असे मुंबई हून आलेले डॉ शेरसिंग राठोड यांनी सांगितले. डॉ उषाताई तनपुरे यांनी विस्टिओन कंपनी चे अध्यक्ष आशिष भाटिया पुणे यांचे आभार मानले. मधुकर घाडगे यांनी आपल्या प्रस्ताविकात सांगितले की, राहुरी तालुक्यात शासनाच्या योजना तळागाळातील दिव्यांगांपर्यत पोहचलवयाचे काम प्रहार करत आहे. आमदार निधी मधून राहुरी मतदार संघातील दिव्यांगांसाठी तीनचाकी सायकल, कानाचे मशिन, कुबड्या करण्यात याव्या तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या कमेटी करण्यात यावी, अशी मागणी प्रहारचे तालुकाध्यक्ष मधुकर घाडगे यांनी केली आहे.

तसेच राहुरी मुलनं माथा येथील दिव्यांग महिला भगिनी सुनीता लोखंडे खूप गरीब आहे. घराची जागा इनामी असल्याने घरकुल मिळत नाही. यांचे पावसाने घर पडल्याने रहायला घर नाही. ते घर उभे करण्याचा मानस आहे. तरी आपण या घरासाठी आर्थिक किंवा वस्तू स्वरुपात मदतीसाठी प्रहारचे सचिव योगेश लबडे यांच्या कडे संपर्क साधावा. यावेळी बाळासाहेब जाधव यांनी घरासाठी चार पत्रे देण्याचे आश्वासन दिले तसेच प्रहार जिल्हा समन्वयक राजेंद्र पोकळे यांनी 1100 रूपयांची मदत दिली आहे.

प्रहारच्या माध्यमातून वर्षभर अनेक उपक्रम राबवले जातात. यामध्ये एका दिव्यांग भगिनीसाठी घर बांधून दिले दोन दिव्यांगांसाठी तीन चाकी सायकल एका दिव्यांगांसाठी व्हीलचेअर तसेच कै कडूभाई पठाण तसेच दिव्यांग असणारे अरुण पटारे यांच्या कुटुंबासाठी आर्थिक मदत देण्यात आली. दिव्यांगांसाठी अन्तोदय रेशनकार्ड मिळवून दिले. दिव्यांगांच्या अडचणी सोडविल्या जातात. डॉ उषाताई तनपुरे म्हणाल्या राहुरी तालुक्यातील प्रहारचे काम खूपच सुंदर आहे ही संघटना गरीब दिव्यांगांसाठी काम करते. जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव  पोकळे आपल्या भाषणात राहुरी प्रहारचे कौतुक केले आहे.

या कार्यक्रमास जिल्हा समन्वयक राजेंद्र पोकळे, किशोर सुर्यवंशी, हजारे, श्रीरामपुर ता अध्यक्ष गुलाब पठाण, उपाध्यक्ष संदेश रपाडिया उपस्थीत होते. कार्यक्रम पार पडण्यासाठी तालुका संघटक तुकाराम बाचकर, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय महानोर, महिला अध्यक्षा सौ रुपाली जाधव, तालुका उपाध्यक्ष विठ्ठल पांडे, तालुका सचिव योगेश लबडे, देवळाली शहराध्यक्ष  सलीमभाई शेख, कार्याध्यक्ष संजय देवरे, राहुरी शहराध्यक्ष वैभव थोरात, संपर्क प्रमुख रवींद्र भुजाडी, देवळाली शहर उपाध्यक्ष अनिल मोरे, सोनगाव शाखा अध्यक्ष अनुराधा घोडेकर, सुखदेव कीर्तने, ब्राम्हणी शाखा अध्यक्ष बाबुराव शिंदे, टा मियाँ शाखा अध्यक्ष  नानासाहेब शिंदे, उपाध्यक्ष सुरेश दानवे, तालुका संघटक आप्पा गाढे, दत्तात्रय खेमनर,  वांबोरी शाखा अध्यक्ष शशिकांत कुर्हे, संदीप  कुलकर्णी, वाय एस तनपुरे, अनामिका हरेल, आदिनाथ दवणे इत्यादी उपस्थीत प्रहार तालुका संघटक कै शाम भाऊ बोरुडे यांच्या स्मरणार्थ उपस्थीत सुरुची भोजनाची सोय ज्येष्ट पत्रकार रमेश बोरुडे, शिवाजी आप्पा डौले यांनी केली. आभार महिला उपाध्यक्षा छाया ताई हारदे यांनी मानले.

Related Articles

Back to top button