कृषी

परसबागेतील कुक्कुटपालन फायदेशीर पुरक व्यवसाय – प्रमुख पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र निमसे

राहुरी विद्यापीठ : शेतकर्यांनी शेतीबरोबरच पुरक व्यवसाय म्हणुन परसबागेतील कुक्कुटपालनाचा अवलंब करावा. परसबागेतील कुक्कुटपालनामुळे कुटुंबास आर्थिक हातभार मिळतो व कुटुंबातील सदस्यांसाठी एक पोषण सुरक्षीततेचा स्त्रोत उपलब्ध होतो असे प्रतिपादन प्रमुख पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र निमसे यांनी केले.

कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील व भा.कृ.अ.प. शेतकरी प्रथम प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ. पंडित खर्डे यांच्या नेतृत्वाखाली महात्मा फुले कृषि विद्यापीठातील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचा शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत परसबागेतील कुक्कुटपालन एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन तांभेरे गावात करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना डॉ. रविंद्र निमसे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शेतकरी प्रथम प्रकल्पाचे समन्वयक डॉ. सचिन सदाफळ व प्रकल्पाचे सहसमन्वयक डॉ. भगवान देशमुख, प्रगतशील शेतकरी सुनील शेलार आणि साहेबराव लोंढे उपस्थित होते.

मार्गदर्शन करतांना डॉ. रविंद्र निमसे पुढे म्हणाले परसबागेतील कुक्कुटपालनाचा मुळ उद्दिष्ट कमी खर्चात पिल्लांचे संगोपन करणे हे आहे. शेतकर्यांनी पहिल्या महिन्यात ब्रुडींग, लसीकरण व खाद्य व्यवस्थापन यावर लक्ष केंद्रित केल्यास पिल्लांची मर होत नाही. एक महिन्यानंतर कोंबड्यांचे रोग व्यवस्थापन व आहार व्यवस्थापन शास्त्रीय दृष्ट्या करावे. परसबागेतील कुक्कुटपालनातुन एक चांगल्या प्रकारचा उत्पन्नाचा स्त्रोत शेतकर्यांना उपलब्ध होतो. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. सचिन सदाफळ यांनी केले.

यावेळी डॉ. भगवान देशमुख यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये पोषण सुरक्षीततेसाठी परसबागेतील कुक्कुटपालन महत्वाचे असल्याचे म्हणाले. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रगतशील शेतकरी राधाकृष्ण गागरे, रविंद्र मुसमाडे तसेच तांभेरे व कानडगाव या गावातील 100 पेक्षा जास्त शेतकरी व महिला शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय शेडगे यांनी केले तर आभार किरण मगर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल कोर्हाळे व किरण मगर यांनी परिश्रम घेतले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button