अहमदनगर

ॲड.रावसाहेब शिंदे आणि डॉ.मंचरकर यांचा वैचारिक वारसा जपला पाहिजे- डॉ.सुधीर तांबे

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : भारतीय स्वातंत्र्य संग्राम, शैक्षणिक, सामाजिक सेवेचे आदर्श असणारे स्व. ॲड.रावसाहेब शिंदे आणि शिक्षण, साहित्य क्षेत्रातील ज्ञानतपस्वी व्यक्तिमत्त्व असणारे स्व. डॉ. र.बा. मंचरकर यांच्या समर्पित जीवन कार्याचा वैचारिक वारसा जपला पाहिजे असे मत माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केले.

येथील विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे महादेव मळ्यात ॲड. रावसाहेब शिंदे यांच्या ९६ व्या जयंती निमित्त राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. आमदार डॉ. सुधीर तांबे बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. राजीव रावसाहेब शिंदे होते. प्रारंभी ॲड. रावसाहेब शिंदे यांच्या समाधीला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. ॲड. शिंदे व डॉ.र.बा. मंचरकर यांच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव सुखदेव सुकळे यांनी स्वागत, प्रास्ताविक करून पाहुण्यांचे सत्कार केले. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी पाहुण्यांचा परिचय ओळख करून दिला.

यावेळी डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते माजी प्राचार्य टी.ई. शेळके यांना स्व.ॲड. रावसाहेब शिंदे स्मृती जीवन गौरव पुरस्कार तर कोपरगाव येथील प्रा.डॉ. बाबासाहेब शेंडगे यांना स्व. डॉ. र.बा. मंचरकर स्मृती प्रेरणा पुरकार प्रदान करण्यात आले. सन्मानपत्र, शाल, बुके, पुस्तके, गौरवचिन्ह देऊन दोघांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य टी.ई. शेळके, डॉ. बाबासाहेब शेंडगे, डॉ. प्रेरणा शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. सुधीर तांबे यांनी ॲड. रावसाहेब शिंदे, डॉ. अण्णासाहेब शिंदे, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात, कॉम्रेड ॲड. पी.बी. कडू पाटील यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान सांगून कौटुंबिक आठवणींना उजाळा दिला.

साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात एक चारित्र्य संपन्न, अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून डॉ. मंचरकर यांचे वेगळेपण स्पष्ट करून रावसाहेब शिंदे व डॉ. मंचरकर यांचे परस्पर संबंध सांगितले. योग्य व्यक्तींना पुरस्कार दिल्याबद्दल विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे अभिनंदन केले. अध्यक्षीय भाषणातून डॉ. राजीव शिंदे यांनी पुरस्कार्थीचे अभिनंदन करून डॉ. सुधीर तांबे यांच्यासारख्या वैद्यकिय, सामाजिक, शैक्षणिक कार्यात योगदान देणाऱ्या प्रामाणिक, अनुभवी व्यक्तींच्या उपस्थितीत कार्यक्रम झाल्याचे यावेळी समाधान व्यक्त केले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी उपस्थितांना आपली नवी पुस्तके ‘ग्रंथसंवाद, माकडांच्या हाती शाळेची खिचडी’ ही पुस्तके सस्नेह भेट दिली. माजी तहसिलदार गुलाबराव पादीर यांनी सत्कार्थींचा शाल, बुके देऊन सत्कार केला.

सोहळ्यास शशिकलाताई शिंदे, सुजाताताई हुंबे, डॉ. प्रथमा मंचरकर, प्रकाश पाटील निकम, ॲड. भागचंद चुडिवाल, प्राचार्य डॉ. दिनानाथ पाटील, प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, प्राचार्य विनोद रोहमारे, बापूसाहेब पटारे, डॉ. रवींद्र कुटे, ह.भ.प प्रा. सखाराम कार्डिले महाराज, नितीन औताडे, प्राचार्या रंजना जरे, प्राचार्या चित्रा सूरडकर, डॉ. श्रीकांत भालेराव, प्राचार्य डॉ. गोरख बारहाते, रामराव पडघन, सुभाष लिंगायत, दत्तात्रय रायपल्ली, सुभाषराव गायकवाड, बाबासाहेब चेडे, भीमराज बागूल, जयाताई फरगडे, मुख्याध्यापक भागवतराव मुठे, भागचंद औताडे, प्रा.सौ.जयश्री शेंडगे, प्रा.अंकिता शेंडगे, अपूर्व शेंडगे, अनुजा शेंडगे, अशोक खेमनर आदी उपस्थित होते.

बाळासाहेब बुरकुले, संकेत बुरकुले, सुयोग बुरकुले, कय्युम शेख, सतिश गवळी, सतिश थोरात, पुंडलिक खैरनार, रावसाहेब राशिनकर, अमित त्रिभुवन, भाऊसाहेब जाधव आदींसह शिक्षक, शिक्षिका यांनी नियोजन केले. सूत्रसंचालन संगीता फासाटे यांनी करून आभार मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button