अहमदनगर

पत्रकार संघाच्या उत्तर जिल्हा महिला सचिवपदी चैताली हारदेंची नियुक्ती

राहुरी : ग्रामीण भागातील पत्रकारांना अजूनही अनेकविध समस्यांना सामोरे जावे लागते. विशेषतः ग्रामीण भागातील महिला पत्रकारांना म्हणावी तशी योग्य संधी पत्रकारीता क्षेत्रात मिळत नाही. अशा सर्व घटकांना युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या माध्यमातून मोठ्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी या पत्रकार संघाचा प्रयत्न राहणार असल्याचे प्रतिपादन नाशिक विभाग अध्यक्ष शरद तांबे यांनी केले.

अहमदनगर उत्तर जिल्ह्याच्या सचिवपदी राहुरी तालुक्याच्या जिराईत भागातील शेतकरी, कष्टकरी, वंचित घटकातील सर्व सामान्यांच्या व्यथा मांडत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत असलेल्या सौ.चैतालीताई हारदे यांची नियुक्ती करण्यात आली. प्रसंगी त्यांना अहमदनगर जिल्हा सचिव बाळकृष्ण भोसले यांचे हस्ते व शरद तांबे यांचे उपस्थितीत नियुक्तीचे पत्र देताना ते बोलत होते. प्रसंगी पत्रकार शरद ढमक, भगवान लांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

चैताली हारदे यांनी ग्रामीण भागातील महिला पत्रकारांचे मोठ्या प्रमाणात संघटन करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असून संघटनेच्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांना अधिकाधिक न्याय देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button