अहमदनगर

आय.डी.बी.आय. बँकेच्या बंद एटीएम मुळे ग्राहकांची गैरसोय

श्रीरामपुर | बाबासाहेब चेडे  : हरिगांव – उंदिरगांव बाजार पेठे मध्ये आय.डी.बी.आय. बँकेची शाखा काही वर्षा पुर्वी सुरु झाली. अनेकांनी या बँके मध्ये आपापले खाते उघडले. विशेष म्हणजे जेष्ठ नागरीकांना, व्यापाऱ्यांना, शालेय विद्यार्थ्यांना त्याचा खुप फायदा झाला.
काही कालावधी नंतर बँकेने एटीएम मशीन बाजारपेठे मध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले. परंतु गेल्या काही महिन्यांपासुन सदर चे एटीएम मशीन बंद असल्यामुळे ग्राहकांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. तरी बँक व्यवस्थापनाने एटीएम मशीन पुर्ववत चालु करून ग्राहकांची गैरसोय दुर करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Back to top button