अहमदनगर

केंदळ खुर्द महिलांसह ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

व्हिडीओ : केंदळ खुर्द ग्रामस्थांनी मांडल्या आपल्या व्यथा

आरडगांव प्रतिनिधी/ राजेंद्र आढाव :

राहुरी तालुक्यातील केंदळ खुर्द ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांकडून गावातील समस्या सुटत नसल्याने १५ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत‌ कार्यालयासमोर महिलांसह ग्रामस्थांनी उपोषणा इशारा दिला आहे.

    गावातील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले गांवाअंतर्गत रस्ते, पिण्याचे व वापराचे पाणी, नादुरुस्त पाण्याची टाकी, बंदिस्त गटार योजना, प्रलंबित घरकुल प्रश्न, पिण्याच्या पाण्यावरील अनाधिकृत इलेक्ट्रॉनिक मोटारी बंद करण्यात यावे या बाबतचे ग्रामपंचायतकडे लेखी निवेदन २१ मे रोजी गावातील अंतर्गत रस्ते, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन बदलून मिळण्याबाबत २२ जुन रोजी पिण्याच्या‌ अनाधिकृत इलेक्ट्रॉनिक मोटारी कारवाई होणे बाबत, दलित वस्तीतील अनेक दिवसांपासून बंद असलेली पाण्याची टाकी दुरुस्ती करुन मिळावी,गावात सार्वजनिक ठिकाणी मुतारी व स्वच्छालय होणेबाबत तसेच सांडपाणी व जनावरांना पाणी उपलब्ध करून द्यावे. या विषयाचे लेखी निवेदन ग्रामपंचायतीकडे देण्यात आले होते.पंरतु कुठलेही उत्तर न मिळाल्याने १३ जुलै रोजी राहुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व ६ जुलै रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे माणिक आढाव, गहिनीनाथ राशिनकर, प्रकाश आढाव, सचिन गुंजाळ, रवींद्र गुंजाळ, दीपक आढाव, विजय आढाव, बाबासाहेब आढाव,सोमनाथ झिने, लक्ष्मण जाधव, लहानु जाधव, सुरेश जाधव, गुलाब गोलवड, विलास मोरे, ताराचंद केदारी, बबन केदारी, सुरेश गोलवाड,अनिल माळी, विजय आढाव, किशोर जाधव, भरत माळी, सुनील जाधव, इंदुबाई केदारी, अनिता पाटोळे, ताई आढाव,संगीता मनतोडे, सुरेखा जाधव, संगीता केदारी आदि महिलांसह ग्रामस्थांनी १५ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button