शिक्षणवारी ज्ञान पंढरी

शेवगाव महाविद्यालयामुळे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ आणि ऊर्जा मिळाले- माजी विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भाटकर

राहुरी / बाळकृष्ण भोसले – “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी संस्थेने काळाची पावले ओळखून शेवगाव येथे महाविद्यालयाची उभारणी केली. त्यामुळे तळागाळातील विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग झाला. त्यांच्या स्वप्नांना बळ आणि ऊर्जा मिळाली. मातीचा वसा आणि वारसा घेऊन सुरु झालेले हे महाविद्यालय आज सुसज्ज झाल्याचे पाहून आनंद वाटला.” असे प्रतिपादन माजी विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भाटकर यांनी केले.
शेवगाव येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्ताने माजी विद्यार्थी मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती निर्मला काटे होत्या. विचारपीठावर माजी पोलीस सहाय्यक आयुक्त बाबासाहेब बुधवंत, अप्पर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात, माजी प्राचार्य खासेराव शितोळे, माजी प्राचार्य शिवाजीराव देवढे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष संजय फडके, बापूसाहेब भोसले, प्राचार्य डॉ.पुरुषोत्तम कुंदे, प्रा.गणगे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्राचार्य शितोळे म्हणाले की, “एका रूम मधुन सुरु केलेल्या कॉलेज चा आज वटवृक्ष झाल्याचे पाहून आनंद वाटला. ज्ञानदानाचे पवित्र कार्य करतांना अनेकांचं सहकार्य लाभले”, तर प्राचार्य देवढे म्हणाले की, “वर्षातून एकदा तरी महाविद्यालयात येऊन शक्य असेल ते दिलं पाहिजे, अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर विराजमान असुन त्यांनी नव्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. श्रीमती निर्मला काटे, बाबासाहेब बुधवंत यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरविंद देशमुख यांनी केले, अध्यक्ष संजय फडके यांनी स्वागत करून परिचय करून दिला. मनेष बाहेती यांनी अहवाल वाचन केले. शेवटी प्राचार्य पुरुषोत्तम कुंदे यांनी आभार मानले. यावेळी माजी विद्यार्थीनी कवियत्री शर्मिला गोसावी, ॲड.अनिल सरोदे, केदारेश्वर चे उपाध्यक्ष महादेव काटे, क्रीडाधिकारी अनिल वीर यांचा तसेच सर्व माजी प्राध्यापकांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी शब्दगंध साहित्यिक परिषद चे संस्थापक सुनील गोसावी, कुकाणा ग्रा. प. सदस्य बाळासाहेब गर्जे, कॉ.संजय नांगरे, एमएसईबी चे अधिकारी सुरेश जायभाय, कांचन उद्योग चे सुभाष जाधव, बाप्पुसाहेब गवळी, बाप्पुसाहेब मगरे, बाळासाहेब डाके, ओमप्रकाश जाजू, अशोक उगलमुगले, राजेंद्र पोटफोडे, हरिभाऊ नजन, बाळासाहेब फलके, प्रा.सुनील काकडे, प्रा.काकासाहेब लांडे, मिलुंद काटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश दहिफळे, गोरक्षनाथ काळे, डॉ.युवराज सुडके, चंद्रकांत कर्डक, डॉ.रवींद्र जैन, डॉ.रवींद्र वैद्य, मनीष बाहेती, अरविंद देशमुख यांनी प्रयत्न केले.

Related Articles

Back to top button