महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्प आणि सुपारी व मसाला विकास निदेशालय, कालिकत (केरळ) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय चर्चासत्राचे उद्घाटन डॉ. शिर्के यांच्या हस्ते झाले. यावेळी ते उपस्थित शेतकरी व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अहिल्यानगर येथील गंगाधरशास्त्री गुणे आयुर्वेदिक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुरजसिंग ठाकूर तसेच प्राध्यापक डॉ. अमित शिनगारे उपस्थित होते. कार्यक्रमास कृषी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजू अमोलिक, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. विक्रम कड, कृषी कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. उत्तम कदम, कडधान्य प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सुरेश दोडके, डॉ. संजय गावडे, डॉ. मुकुंद भिंगारदे, डॉ. विलास आवारी, डॉ. नंदकुमार कुटे तसेच औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्पाचे प्रमुख डॉ. विक्रम जांभळे यांची उपस्थिती होती.
यावेळी डॉ. सुरजसिंग ठाकूर यांनी औषधी व सुगंधी वनस्पतींच्या मूल्यवर्धित उपयोगांबाबत माहिती दिली. डॉ. अमित शिनगारे यांनी आयुर्वेदातील औषधे : शेतीसाठी नवी दिशा या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. विजू अमोलिक यांनी औषधी व सुगंधी वनस्पतींमधील शेतकऱ्यांसाठीच्या संधी स्पष्ट केल्या. डॉ. विक्रम कड यांनी हळद, आले व मिरची लागवड व काढणी पश्चात तंत्रज्ञान, डॉ. संजय गावडे यांनी गवती चहा व जावा सिट्रोनेला सुधारित लागवड तंत्रज्ञान, तर डॉ. विक्रम जांभळे यांनी औषधी व सुगंधी वनस्पतींचे महत्त्व व उपयोग यावर सविस्तर माहिती दिली.
या चर्चासत्रात सुधारित शेती तंत्रज्ञान, विपणन व्यवस्था तसेच आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी युवकांसाठी निर्माण होणाऱ्या नव्या संधींवर सखोल चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. विक्रम जांभळे यांनी केले. या कार्यक्रमास १५० पेक्षा अधिक शेतकरी व विद्यार्थी मोठ्या उत्साहात उपस्थित होते.

0 टिप्पण्या