ठळक बातम्या

शासनाने बंद पाणी पुरवठा योजनांचे त्वरित बिले भरावीत – सुरेशराव लांबे पाटील

राहुरी : तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या मुळा धरणातुन अनेक प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरू आहेत. या सर्व योजनांना प्रत्येक महिन्याला लाखोंची बिले येतात. या पाणी पुरवठा योजना विज बिलाच्या नावाखाली वर्षभरातुन अनेकवेळा विद्युत महावितरणाचे अधिकारी बंद करतात. याकडे लोकप्रतिनिधी व विद्यमान शासनाचे अधिकारी, पदाधिकारी हेतुपुरस्कर दुर्लक्ष करत आहेत. या काळात कार्यक्षेत्रातील नागरिकांचे व लहान मुलांचे आरोग्य हेतुपुरस्कर धोक्यात आणतात. सध्या 8 दिवसांपासुन बंद असलेली सोनई करजगाव व ईतर योजना त्वरीत चालु करावी अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे यांनी दिला आहे.

भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे उलटुन गेली. तरी आजही देशातील नागरिकांना अन्न वस्त्र निवारा या मूलभुत गरजांचा अभाव आहे. त्यातच निसर्गाने फुकट दिलेले पाणी देखील या राज्यकर्त्यांनी नागरिकांना सवलतीच्या दरात दिले नाही. अजुनही अनेक गावात पाणी योजना नाही.

पाणी हे जीवन समजले जाते. मनुष्याच्या आरोग्याची सुरुवात ही पाण्यापासुन होते. पाण्यामध्ये अनेक सुक्ष्म जीवजंतु असतात. अनेक आजार अशुद्ध पाण्यामुळे उद्भवतात. त्यामध्ये संपुर्ण देशामध्ये गेल्या दोन वर्षांपुर्वी कोरोना सारखा भयानक असलेला हा आजार सर्दी, खोकला, निमोनिया हि सर्व हे लक्षण असलेला आजार हा केवळ अशुद्ध पाणी व पाणी बदल यासारख्या कारणाने होतो, अस तज्ञांच्या लक्षात आले.

त्यातच राहुरी तालुक्यात व राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदार संघातील कार्यक्षेत्रात कोरोना काळात अनेक तरुण, वृद्ध माता भगिनी यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यात कोणाची आई गेली, कोणाचे वडील गेले, कोणाची पत्नी गेली, कोणाचे पती गेले, कुणाचा तरुण मुलगा, सुन गेली असे प्रत्येकाचे अनेक नातेवाईक आपण कोरोना काळात जाताना बघितले. तरी नगर जिल्ह्यातील तसेच राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या कार्यक्षेत्रात पुर्वीपासुन चालु असलेले मुळा धरणातुन अनेक प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आहेत व मागील पंचवार्षिक मध्ये मंजुर झालेली ब्राम्हणी व इतर 7 गावांची नविन योजनेचे काम चालु आहे, महाराष्ट्र शासन या योजनांसाठी कोट्यावधीचा खर्च करते.

या पाणी पुरवठा योजनेचे बिल मिटर प्रमाने दर महीन्याला लाखो रुपये येते व मेंटेनेस, पाणी पुरवठा कर्मचारी या सर्व खर्चाची बेरीज मोठ्या प्रमाणात होते. ग्रामपंचायतींना त्या प्रमाणात वसुल होत नाही. या सर्व पाणी योजना विज बिलाच्या नावाखाली प्रत्येक महीन्यात 8 ते 15 दिवस बंद ठेवतात. या काळातील पाणी बदलामुळे राहुरी तालुक्यातील व राहुरी नगर पाथर्डी विधानसभा कार्यक्षेत्रातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. या सर्व गोष्टीला या मतदारसंघातील व जिल्ह्यातील लोकप्रतिनीधी व शासनाचे अधिकारी पदाधिकारी जबाबदार आहे.

तरी मुळा धरणातील सर्व पाणीपुरवठा योजनांची विज बिले एच.पी. प्रमाणे द्यावीत किंवा हे बिल महाराष्ट्र शासनाने भरावीत व यापुढे कुठलीच पाणीपुरवठा योजना विज बिलाच्या व इतर कारणांनी जास्त वेळ बंद करुन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणु नयेत व बंद असलेल्या सर्व पाणी योजना त्वरित चालु कराव्यात अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल असा सुचक इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष व सर्वसामान्यांचे नेते सुरेशराव लांबे पाटील यांनी दिला आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button