शिक्षणवारी ज्ञान पंढरी

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास तीव्र आंदोलन – ढुस

देवळाली प्रवरा प्रतिनिधी : येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुल्क भरून घेतल्या शिवाय दाखले मिळत नसल्याने या विषयावर तात्काळ तोडगा काढला नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आंतरराष्ट्रीय खेळाडू  आप्पासाहेब ढुस यांनी दिला आहे.      

     येथील आय टी विषयातील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी महाविद्यालयाकडे चकरा मारीत असून केवळ आय टी विषयाचे शुल्क भरायचे बाकी राहिल्याने विद्यालय विद्यार्थ्यांना दाखले देत नाही. त्यामुळे एकीकडे कोरोनामुळे पालक शुल्क भरू शकत नाही तर दुसरीकडे पुढील शिक्षण प्रवेशाची मुदत संपत आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. मुलांसाठी इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था निर्माण झाल्याने ढुस यांच्या नेतृत्वाखाली येथील आय टी च्या सर्व विद्यार्थ्यांनी आय टी विषयाचे शुल्क माफ करून पुढील शिक्षणासाठी तात्काळ दाखले मिळावे या मागणीचे निवेदन विद्यालयाचे प्राचार्य गुंड यांना दिले. या विषयावर तात्काळ तोडगा काढुन विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक नुकसान टाळावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ढुस यांनी दिला आहे.

Related Articles

Back to top button