ठळक बातम्या

मुळा पाटबंधारे विभागाकडुन या पडलेल्या पुलाची पाहणी

आरडगांव/ राजेंद्र आढाव : मुळा नदीवरील बंधारा शेजारील जीर्ण झालेला पूल मुसळधार पावसाने कोसळल्याने मानोरी-केंदळ या दोन गावांची वाहतूक ठप्प होऊन संपर्क तुटला होता. याबाबत तातडीने मुळा पाटबंधारे विभागाकडुन या पडलेल्या पुलाची पाहणी करून वाहतूकीसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, राहुरी तालुक्याच्या पुर्व भागातील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा मानोरी केटीवेअर बंधारा या बंधाऱ्या शेजारील पुल अचानक झालेल्या पावसाने कोसळल्याने मानोरी-केंदळ या दोन गावांची वाहतूक ठप्प झाली. याबाबत मूळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, उप अभियंता आण्णासाहेब आंधळे, शाखा अभियंता शरद कांबळे आदिंसह अधिकारी पदाधिकारी यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली आहे. मुळा नदीवरील बंधारा शेजारील हा पूल गेल्या अनेक दिवसापासून जीर्ण झाला होता. सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात ओढे-नाले वाहू लागल्याने या पावसाच्या पाण्याने जीर्ण झालेला हा पूल अखेर कोसळला होता. पुलाचे काम लवकर मार्गी लागणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे नागरीकांमधून समाधान व्यक्त केले आहे. याप्रसंगी मा. उपसभापती रविंद्र आढाव, सरपंच आब्बास शेख, आण्णासाहेब तोडमल, उत्तम खुळे, शिवाजी आढाव, गोकुळदास आढाव, चाॅदभाई शेख, शामराव आढाव, लक्ष्मण आढाव, राजेंद्र आढाव, पंढरीनाथ आढाव, उद्धव आढाव, गोरक्षनाथ गुंड आदिंसह नागरीक उपस्थित होते.

मानोरी- केंदळ या दोन गावांना जोडणाऱ्या मुळानदी वरील बंधाऱ्या शेजारील कोसळलेल्या पुलाची पाटबंधारे विभागाकडुन पाहणी करण्यात आली आहे. दोन गावांची वाहतूक बंद झाल्याने संपर्क तुटला आहे. याबाबत येथील शेतकरी भाऊसाहेब गुंजाळ यांच्याशी चर्चा करून त्यांच्या शेतातुन नळ्या टाकून वाहतूकीची व्यवस्था करण्यात येईल पुलाच्या कामास मंजुरी आल्यावर व पावसाचे पाणी कमी झाल्यावर लवकरच काम सुरू करण्यात येईल.
~ सायली पाटीलकार्यकारी अभियंता मुळा पाटबंधारे विभाग )

Related Articles

Back to top button