अहमदनगर

आठवडे बाजार सुरु करण्याची श्री संत सावता माळी युवक संघ व मनसेची मागणी

जिल्ह्यातील आठवडे बाजार सुरु करावेत, या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित यांना देताना जिल्हाध्यक्ष अशोक तुपे, मनसेचे सचिव नितीन भुतारे आदि. ( छाया : राजु खरपुडे )

वांबोरी प्रतिनिधी : कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून कमी होत असताना, शासनानेही जवळ-जवळ अनेक व्यावसायिक व सार्वजनिक कार्यक्रमांवरील निर्बंध शिथिल केले आहेत. परंतु आजूनही आठवडे बाजार बंद आहेत. आठवडे बाजारावर अवलंबून असणार्‍यांच्या उपजिविकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, तेव्हा तातडीने हे आठवडे बाजार सुरु करावेत, अशा मागणीचे निवेदन श्री संत सावता माळी युवक संघ व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक तुपे, मनसेचे सचिव नितीन भुतारे, अनिल इवळे, समिर शेख, रोहित वाळके, दत्तात्रय साळूंके, माऊली गायकवाड आदि उपस्थित होते.


जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनामुळे अनेक निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळे सर्वच व्यवसायिकांबरोबरच सर्वसामान्यांवर मोठे संकट निर्माण झाले होते. आता निर्बंध शिथिल होत असतांनाही जिल्ह्यातील आठवडे बाजार बंद असल्याने यावर अवलंबून असणार्‍यांनी उपजिविका चालवण्यासाठी मोठी कसरत त्यांना करावी लागत आहे. अनेकांनी व्यवसायाकरिता बँकेची कर्ज घेतले आहे, ते कसे फेडायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात अनेकांनी आत्महत्याही केल्या आहेत. तेव्हा आताच्या सणासुदीच्या दिवसांमध्ये जिल्ह्यातील आठवडे बाजार सुरु करावेत. नियमांचे पालन करुन हे व्यवसायिक करण्यास हे व्यवसायिक तयार आहेत, तेव्हा आठवडे बाजार सुरु करावे, अशी कळकळीची विनंती निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी दिपक साखरे, सुनिल शिंदे, सुरेश आरोटे, श्याम औटी, प्रदीप आंभोरे, अमिर शेख, आरिफ आत्तार, वसिम सत्तार, संतोष जाधव आदि उपस्थित होते.

Related Articles

Back to top button