कृषी
शेतीविषयक समस्यांवर कृषी दुताचा कात्रड मधील शेतकऱ्यांशी संवाद
खडांबे/ दिपक हरिश्चंद्रे : तालुक्यातील कात्रड येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी जागरुकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव उपक्रमांतर्गत आलेल्या कृषीदूत प्रणव अशोक शर्मा यांचे स्वागत करण्यात आले .यावेळी कृषी क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
कृषीदुत प्रणव शर्मा हे पुढील काळात गावातील शेतकऱ्यांना माती परीक्षण ,फळबाग लागवड ,सेंद्रिय शाश्वत शेती ,किड व रोग व्यवस्थापन ,आर्थिक नियोजन यांचे प् प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करणार आहे. चर्चेवेळी गावचे सरपंच बाबासाहेब शिंदे, उपसरपंच ऋषिकेश घुगरकर, ग्रामसेवक राऊत भाऊसाहेब तसेच अनिल मकासरे, तानाजी सत्रे, अशोक बर्डे, शेख अब्बास इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी कृषीदूत शर्मा यांना महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. एस. बी .धोंडे, उपप्राचार्य डॉ.एच. एल. शिरसाठ समन्वयक प्रा .के .एस .दांगडे, डॉ.एस .बी राऊत, प्रा. ए .व्ही भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.